Saturday, August 5, 2023

 आपल्याला नोंदी : अहमेदनगऱ् १

 

अहमदनगर या शहराशी माझा तसा कधी संबंध आला नव्हता. तो आला ‘कांकरिया कार्डक’ या

बालनाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमुळे. या संस्थेने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली आणि त्या निमित्ताने त्यांना एक स्मरणिका प्रकाशित करावयाची होती आणि त्या स्मरणिकेच्या संपादनात साहाय्य आणि मुद्रित शोधन  करावे अशी विनंती माझे नगरकर मित्र जयंत एलुलकर यांनी केली आणि या निमित्ताने माझा नगरशी संबंध आला.

काना, मात्रा, वेलांटी नसलेले गाव अशी नगारची  एक ओळख आहे. तसेही ते गाव अत्यंत रुक्ष आहे असा माझा समज होता. प्रा. मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापुरकर असे नाट्यकर्मी या गावाचे आहेत अशी ,माहिती होती.

‘रं ग मं च’ या स्मरणिकेचे काम करताना, त्यातील लेख वाचताना लक्षात आले की, कांकरिया करडकाचे डॉ. प्रकाश कांकरिया आणि डॉ. सुधा कांकरिया यांनी फार मोठे काम केले आहे. मागील पंचवीस वर्षे बालनाट्य स्पर्धा आयोजित करणे, तेही कोणाकडून आर्थिक साहाय्य न घेता ही खरोखरीच रंगभूमीची सेवाच म्हटली पाहिजे. मागील पंचवीस वर्षात निदान काही हजार कलाकार या रंगमंचावर येऊन गेले आहेत; आणि आज त्यातील अनेक जण विविध मालिकांतून तसेच हिंदी, मराठी चित्रपटांतून तसेच ओटीटी पटलावर, काही दिग्दर्शक म्हणून काही तंत्रज्ञ म्हणून  आपल्या कलेचे दर्शन घडवित आहेत. कांकरिया करंडकाच्या रंगमंचावर जी लहान पावले पडली त्यांचा मोठा ठसा पुढे कलक्षेत्रावर        

उमटला त्याचे सर्व श्रेय कांकरिया या कलासक्त दाम्पत्याला जाते. स्मरणिकेतील लेखातून

नगरच्या अनेक कलाकारांचा परिचय होतो. तसेच प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन, संहिता, सादरीकरण या अंगाने आणि एकूणच बालनाट्य चळवळीची, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील बालनाट्य चळवळीचे अध्वर्यू रत्नाकर मतकरी, सुद्धा करमरकर, ग्रीप्स चळवळ अशी अनेक प्रकारची माहिती मिळते त्यामुळे ही स्मरणिका, संस्मऱणिका झाली आहे असेच म्हणावे लागेल. बालनाट्य चळवळीची विविधांगी माहिती आणि महाराष्ट्रातील बालनाट्य शिबिरे आणि स्पर्धा घेणाऱ्या संस्थांची सूची असल्यामुले या संस्मऱणिकेला एका संदर्भ ग्रंथाचे स्वरूप आले असून ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही उल्लेख करता येईल.

महत्त्वाचे म्हणजे रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने कांकरिया दांपत्याने शहरातील १०१ कलाकारांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन केला आणि त्यांच्या प्रती समाजाला वाटणारी कृतज्ञता व्यक्त केली.

स्मरणिकेचे प्रकाशन ७ मे रोजी नगरच्याच माउली हॉलमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ कवी श्री फ. मु  शिंदे यांच्या हस्ते झाले.   

डॉ. सुधा  कांकरिया या स्वत: नृत्यांगना आहेत. सलग बारा तास शास्त्रीय नृत्य करण्याचा विकर्म त्यांच्या नावावर आहे. डॉ. प्रकाश आणि डॉ. सुधा  हे दोघेही नेत्रतज्ज्ञ आहेत आणि त्यांचा मुलगा आणि सूनही नेत्रतज्ज्ञ आहेत. आपल्या व्यवसायास अनुसरून ही मंडळी विनामूल्य शिबिरे आयोजित करतात. नगरसारख्या काहीशा रुक्ष वातावरण असलेल्या शहरात कांकरिया दांपत्याने कलेचे नंदनवन फुलविले आहे असेच म्हणावे लागेल.

आणि खरोखरीच अहमदनगरमध्ये कांकरिया दांपत्याने ‘साई बन’ येथे १०० एकर जमिनीवर नंदनवन उभे केले आहे. नगरच्या बाहेर १०० एकर जमीन १९९२ साली घेऊन, जिथे  शब्दश: माळरान होते ,

गवताचे पातेही नव्हते तेथे डॉ. प्रकाश यांनी औद्योगिक क्षेत्रातील सांडपण्यावर प्रक्रिया करून, सर्व जमिनीची यथायोग्य मशागत करून तेथे आज दाट झाडी असलेले जंगल, एक विस्तीर्ण तळे, त्यात नौका विहाराची सोय, झिपलाइन, ध्यानगृह, सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याच्या जागा, कठपुतळीचा खेळ असे अनेक उपक्रम आहेत. या सर्व उपक्रमाचे म्हणजे  शुष्क माळरान ते आजचे ‘साई बन’ येथपर्यंतच प्रवास दर्शविणारी फोटो गॅलरीही तिथे आहे. मुख्य म्हणजे अतिशय सुंदर आणि उत्तम ध्वनि व्यवस्था असलेले देखणे अॅम्फी थिएटर आहे. आजूबाजूला पसरलेल्या निसर्गरम्य वातावरणात कोणत्याही कलाकाराला, कलावंताला इथे कार्यक्रम करायची इच्छा होईल. ८ मे २०२३ या दिवशी डॉ. प्रकाश आणि डॉ. सुधा यांनी, रौप्य महोत्सवाच्या आयोजनात सहभागी असलेल्या सर्वांच्या सन्मान साई बन येथेच केला आणि त्यानंतर स्वादिष्ट भोजनाचा रुचकर अनुभव, म्हणजे आईस्क्रीमवर विराजमान झालेली चेरीच! आवर्जून अनुभव घ्यावा असे हे साई बन आहे.

कांकरिया दांपत्याच्या कला आणि नाट्यप्रेमामुळे हे सर्व घडून आले आणि  जयंत येलुलकर यांनी हे घडवून आणले त्यांचे  आभार                    

                   

     

 नोंदी: अहमदनगर २

कांकरिया करंडकाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर जाणे झाले. अहमदनगर येथे माझी आते बहीण डॉ. लीला गोविलकर राहतात. माझे पुण्यात अनेकदा जाणे झाले /होते पण पुण्यापासून जवळ असलेल्या नगरला जाणे झाले नाही आणि त्यामुळे डॉ. लीला गोविलकर यांची भेट कित्येक वर्षांत झाली नाही. आता कांकरिया करंडकाच्या निमित्ताने जातोय तर त्यांची भेट घ्यायचीच असं म्हणत त्यांना फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही अतिशय प्रेमाने त्यांच्याच बंगल्यात मुक्कामास  यायला सांगितले.

डॉ. लीला गोविलकर, वय वर्षे फक्त ८५ , ( म्हणून मी ‘अहो जाहो’ असा उल्लेख करतो )असूनही शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तेज, तल्लख ! त्याचाच अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न.

सकाळी त्यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या गोलाकार बाल्कनीत लीलाताईंशी गप्पा रंगल्या. आधी मुंबईत आणि नंतर अहमदनगरला अध्यापनाचे  काम करणाऱ्या लीलाताईंना  स. ग. मालशे, अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभलेले. भाषा विज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट जरी केली असली तरी त्यांना सगळ्याच विषयात रस होता. त्यांच्या टेबलावर एकाच वेळेस तीन पुस्तकांची कामे पडलेली होती. लिहून झालेले बरेचसे फूलस्केप तिथे होते. लीलाताईंचे ‘ज्ञानेश्वरीचे वाङमयीन वैभव हे पुस्तक मी वाचले होते. तो धागा मनात ठेवून मी त्यांना म्हटले की “ ज्ञानेश्वरीवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधुचा  काही अंशी परिणाम आहे असे तुम्ही म्हणता, यात ज्ञानेश्वरांना गौणत्व येत नाही का?” त्या म्हणाल्या “ नाही, तसे होत नाही, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या यात निश्चितच साम्य आहे पण अभिव्यक्तीत फरक आहे , आणि तसेही मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यात जवळपास १०० वर्षांचे अंतर आहे, या दीर्घ काळात भाषेच्या सर्वच स्वरूपात आमूलाग्र बदल होतो “ आणखीन महत्त्वाचे विधान त्यांनी केले की अनेक साहित्यिक असो, धार्मिक असो, अशा साहित्यकृतीत लोकसाहित्याचा अंश असतोच! श्रवणीयता हा मौखिक साहित्याचा लक्षणीय गुण आहे.” अशा प्रकारे सुरू झालेली ही बौद्धिक चर्चा, अनेक वळणे घेत अनेक तास चालू होती. नामदेव हे खरे सर्वसामान्यांचे संत, ज्ञानेश्वरांच्या  समकालीन असलेले नामदेव, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांनी पुढारीपण देऊन टाकले. ज्ञानेश्वर हे काहीसे वरिष्ठ वर्गाशी जोडलेले तर नामदेव यांची सर्व सामान्य लोकांशी नाळ जुळलेली. शिवाय नामदेव हे संसारी होते, तुकाराम संसारी होते, संसारात राहून परमार्थ करता येतो, महदंबा, मुक्ताई , जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, रामदास अशी चर्चेची रंगत वाढत ती खांडेकर, फडके, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा वाद; तसेच आर्य हे भरतीयच होते, भारताच्या बाहेरून आलेले नाही, इंडो आर्यन भाषा, भाषेचे संक्रमण, अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेतील साम्य, एका विष्यवारून दुसरा विषय असे कितीतरी  थांबे घेत घेत मी दीड दिवस यथेच्छ बौद्धिक आनंद घेतला.

आपल्या मताविषयी लीलाताई ठाम असतात. एक दोनदा मी थोडेसे वेगळे बोलताच  त्यांनी त्यातील वैचारिक फरक उलगडून दाखविला. सध्या त्यांच्या हातातील तिन्ही प्रकल्प त्यांना वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचे होते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.

त्यांच्याशी बोलताना मला सारखी दुर्गाबाईंची  आठवण येत होती. त्याही बोलण्यात ठाम असत, एक वैचारिक, बौद्धिक करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या बोलत असताना जाणवत असे, तोच अनुभव मला लीलाताईंशी बोलताना आला.

“बौद्धिक चर्चेने पोट काही भरत नाही तेव्हा आता जेवायला चला” अशी प्रेमळ सूचना माझ्या सौने आणि पुतणीने  केली तेव्हा आम्ही उठलो. आणि पुन्हा जेवताना तास दीड तास गप्पा रंगल्याच.

त्यांचा निरोप घेऊन निघताना असे वाटले की हा ज्ञानाचा खजिना, स्त्रोत माझ्या इतक्या जवळ असताना मागील अनेक वर्षांत त्यांची माझी भेट झाली नाही. जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’

या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन आमच्या आरती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर आताची ही भेट  ! खूप काही राहिले असल्याची खंत जाणवणारी आणि बरेच काही मिळाले याचे समाधान देणारी.!

निघताना त्यांनी मला त्यांची २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके “जावे संतांच्या गावा’ आणि “संत नामदेव ::अंतरंग दर्शन” ही भेट म्हणून दिली. 

एका उत्तम भेटीची उत्कट आठवण घेऊन आम्ही परतलो.

सुरेश देशपांडे / डोंबिवली                                   

   नोंदी: अहमदनगर २

कांकरिया करंडकाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने अहमदनगर जाणे झाले. अहमदनगर येथे माझी आते बहीण डॉ. लीला गोविलकर राहतात. माझे पुण्यात अनेकदा जाणे झाले /होते पण पुण्यापासून जवळ असलेल्या नगरला जाणे झाले नाही आणि त्यामुळे डॉ. लीला गोविलकर यांची भेट कित्येक वर्षांत झाली नाही. आता कांकरिया करंडकाच्या निमित्ताने जातोय तर त्यांची भेट घ्यायचीच असं म्हणत त्यांना फोन केला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनीही अतिशय प्रेमाने त्यांच्याच बंगल्यात मुक्कामास  यायला सांगितले.

डॉ. लीला गोविलकर, वय वर्षे फक्त ८५ , ( म्हणून मी ‘अहो जाहो’ असा उल्लेख करतो )असूनही शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या तेज, तल्लख ! त्याचाच अनुभव इथे मांडण्याचा प्रयत्न.

सकाळी त्यांच्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर असलेल्या गोलाकार बाल्कनीत लीलाताईंशी गप्पा रंगल्या. आधी मुंबईत आणि नंतर अहमदनगरला अध्यापनाचे  काम करणाऱ्या लीलाताईंना  स. ग. मालशे, अ. का. प्रियोळकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन लाभलेले. भाषा विज्ञान या विषयात त्यांनी डॉक्टरेट जरी केली असली तरी त्यांना सगळ्याच विषयात रस होता. त्यांच्या टेबलावर एकाच वेळेस तीन पुस्तकांची कामे पडलेली होती. लिहून झालेले बरेचसे फूलस्केप तिथे होते. लीलाताईंचे ‘ज्ञानेश्वरीचे वाङमयीन वैभव हे पुस्तक मी वाचले होते. तो धागा मनात ठेवून मी त्यांना म्हटले की “ ज्ञानेश्वरीवर मुकुंदराजांच्या विवेकसिंधुचा  काही अंशी परिणाम आहे असे तुम्ही म्हणता, यात ज्ञानेश्वरांना गौणत्व येत नाही का?” त्या म्हणाल्या “ नाही, तसे होत नाही, विवेकसिंधु आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्या यात निश्चितच साम्य आहे पण अभिव्यक्तीत फरक आहे , आणि तसेही मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर यांच्यात जवळपास १०० वर्षांचे अंतर आहे, या दीर्घ काळात भाषेच्या सर्वच स्वरूपात आमूलाग्र बदल होतो “ आणखीन महत्त्वाचे विधान त्यांनी केले की अनेक साहित्यिक असो, धार्मिक असो, अशा साहित्यकृतीत लोकसाहित्याचा अंश असतोच! श्रवणीयता हा मौखिक साहित्याचा लक्षणीय गुण आहे.” अशा प्रकारे सुरू झालेली ही बौद्धिक चर्चा, अनेक वळणे घेत अनेक तास चालू होती. नामदेव हे खरे सर्वसामान्यांचे संत, ज्ञानेश्वरांच्या  समकालीन असलेले नामदेव, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरांनी पुढारीपण देऊन टाकले. ज्ञानेश्वर हे काहीसे वरिष्ठ वर्गाशी जोडलेले तर नामदेव यांची सर्व सामान्य लोकांशी नाळ जुळलेली. शिवाय नामदेव हे संसारी होते, तुकाराम संसारी होते, संसारात राहून परमार्थ करता येतो, महदंबा, मुक्ताई , जनाबाई, चोखामेळा, कान्होपात्रा, रामदास अशी चर्चेची रंगत वाढत ती खांडेकर, फडके, जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन हा वाद; तसेच आर्य हे भरतीयच होते, भारताच्या बाहेरून आलेले नाही, इंडो आर्यन भाषा, भाषेचे संक्रमण, अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्या भाषेतील साम्य, एका विष्यवारून दुसरा विषय असे कितीतरी  थांबे घेत घेत मी दीड दिवस यथेच्छ बौद्धिक आनंद घेतला.

आपल्या मताविषयी लीलाताई ठाम असतात. एक दोनदा मी थोडेसे वेगळे बोलताच  त्यांनी त्यातील वैचारिक फरक उलगडून दाखविला. सध्या त्यांच्या हातातील तिन्ही प्रकल्प त्यांना वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचे होते. त्याविषयी त्यांनी माहिती सांगितली.

त्यांच्याशी बोलताना मला सारखी दुर्गाबाईंची  आठवण येत होती. त्याही बोलण्यात ठाम असत, एक वैचारिक, बौद्धिक करारीपणा त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्या बोलत असताना जाणवत असे, तोच अनुभव मला लीलाताईंशी बोलताना आला.

“बौद्धिक चर्चेने पोट काही भरत नाही तेव्हा आता जेवायला चला” अशी प्रेमळ सूचना माझ्या सौने आणि पुतणीने  केली तेव्हा आम्ही उठलो. आणि पुन्हा जेवताना तास दीड तास गप्पा रंगल्याच.

त्यांचा निरोप घेऊन निघताना असे वाटले की हा ज्ञानाचा खजिना, स्त्रोत माझ्या इतक्या जवळ असताना मागील अनेक वर्षांत त्यांची माझी भेट झाली नाही. जवळपास २५/३० वर्षांपूर्वी ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’

या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन आमच्या आरती प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले होते. त्यानंतर आताची ही भेट  ! खूप काही राहिले असल्याची खंत जाणवणारी आणि बरेच काही मिळाले याचे समाधान देणारी.!

निघताना त्यांनी मला त्यांची २०२१ आणि २०२२ मध्ये प्रकाशित झालेली दोन पुस्तके “जावे संतांच्या गावा’ आणि “संत नामदेव ::अंतरंग दर्शन” ही भेट म्हणून दिली. 

एका उत्तम भेटीची उत्कट आठवण घेऊन आम्ही परतलो.

सुरेश देशपांडे / डोंबिवली