खरे तर हे काही पावसाचे दिवस नाहीत, पण काळ रात्री थोडासा पाऊस पडून गेला होता. नेहेमीच्या सवयीने पहाटे उठलो, खिडकी उघडली तर छान उत्साह वाढवणारा गार वा आत आला.एकदम बरे वाटले! प्रसन्न, ताजे तवाने! इतके छान वाटत होते की काही तरी शुभमय,मंगलमय असं जाणवले, चित्तवृत्ती उल्हसित झाल्या
काल संध्याकाळपासून मनावर आलेले अशुभ मळभ, दाटून आलेली निराशा आणि काहीसं भीतीदायक वातावरण या सगळ्याचा मागमूस आताच्या या सकाळी नव्हता.वाटलं अरे! काळ उगीचाच आपण घाबरलो होतो, घाबरण्यासारखं काहीच तर नव्हतं.आहे ना, हा सुंदर प्रकाश देणारा सूर्य, ही प्रसन्न आशादायक सकाळ, हा उल्हसित करणारा वारा आहे! हे सर्व माझ्यासाठी, माझ्या जगासाठी किती स्फूर्तीदायक आहे!
वाटलं, अंधारानंतर प्रकाश येतोच! सकाळ उगवतेच!
आपल्याला वाटलं प्रलयकाळ आला आहे, सगळं संपलं आहे, पण नाही सृष्टीचं कालचक्र फिरतच राहते आहे . अनादी काळापासून अनादी काळापर्यंत! असे कित्येक क्षण, कित्येक युगे पाहिली असतील या सृष्टीने, पण कालचक्र फिरतच आहे अव्याहतपणे जशा समुद्राच्या लाटा, माघारी फिरल्या तरीही पुन्हा तितक्याच उत्कटपणे फेसाळत येणाऱ्या!
एक नवी उमेद, एक नवीन आशा दाखविणारा नवा दिवस, येणारच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, निराश, हताश व्हायचं काहीच कारण नाही. ठीक आहे, संकट आहे, मोठं संकट आहे पण प्रत्येक संकटावर उपाय असतोच ना! आपणही प्रयत्न करतोय, मनापासून केलेले प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होतातच असा विश्वास आहे माझा!
दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट घ्या. हिटलरच्या आक्रमणाखाली एकेक देश पराजित होत होता -पोलंडसारखा लहान देश, तो तर लगेच चिरडला गेला. पण एका छोट्या गावातील काही धाडसी तरुणांनी विरोध सुरु ठेवला. खरं तर हा विरोध म्हणजे महाभयंकर वादळवाऱ्यात लहानशी फडफडणारी पणती पेटविण्याचा प्रकार होता! पण पणती झाली काय किंवा मशाल झाली काय दोन्ही तेजाचीच रूपे! तेज आपला प्रभाव दाखविणारच ना?
पोलंडमधील या लहानशा गावातील तरुणांना लपण्यासाठी आश्रय देण्यासाठी कोरी टेन बूम नावाच्या दोन बहिणी पुढे आल्या. त्यांच्या मातीच्या घराच्या भिंती खूप रुंद होत्या, त्या भिंतीत कोनाडे आणि भुयारे तयार करून
क्रांतिकारी तरुणांना लपण्यासाठी सोय केली.
सांगायचा म्य्द्द हाच की संकट लहान असो, मोठे असो हातपाय गळून बसायचं नसतं. मानवी जीवनावरचा हा लढा सुरूच ठेवायला हवा. आधी एकटा असणारयाच्या पाठोपाठ "कारवाँ बनता चला आता है" आपण एकेक करून जर हे एकवीस दिवस यशस्वी केले तर विजय आपलाच आहे!
एक मात्र नक्की झाले.
हा आपला काळ सुरु होण्यापूर्वी बघा ना आपण सर्व जण किती मुक्तपणे हिंडत होतो, बोलत होतो, समारंभ, कार्यक्रम सर्व सुरु होते, आपण गर्दीत होतो परंतु तरीही आपण एकेकटेच होतो कारण सतत आपल्या हातात मोबाईल, व्हॉटस्अॅप, किंवा यु ट्यूब किंवा फोन! आपल्याबरोबर कोणी आहे, आपण कोणाच्या घरी आहोत, अगदी सिनेमा नाटकातदेखील सारखे तेच आणि तेच.! या सर्व गर्दीत असूनही, सोशल मिडीयावर असूनही आपण एकटेच होतो.
पण आता घरी बसल्यावर लक्षात येतेय की आपण किती अनमोल क्षणांना मुकलो होतो ते? कॉलेजात जाणाऱ्या आपल्या मुलीने नवीन ड्रेस दाखविला
होता का? विचारले तर म्हणाली तुम्हाला फोटो पाठविला होता ना; मुलगा जिमला जाऊन व्यायाम करतोय, म्हणाला तुम्हाला विचारूनच तर जिम लावली होती ! बायकोपण नोकरी करणारी पण ती घरचं सर्व आवरून अगदी ओटा वगैरे पुसून मुलांचा डबा वगैरे भरून आपल्या आधीही घरातून बाहेर पडत होती. आता लक्षात येतेय की ती किती काम करायची ते! आता घरी राहण्यामुळे कितीतरी दिवसांनी आम्हीचौघे आणि आई एकत्र जेवतोय, दुपारी झोपा काढतोय, पूर्वी कधीतरी आवडीने घेतलेली पुस्तके बाहेर आली, जुन्या कॅसेटस् ऐकल्या,
म्हणजे जेंव्हा गर्दीत होतो तेंव्हा एकटे होतो आणि आता एकेकट्याने राहूनही एकत्र येऊन लढा द्यायचा आहे!
काल संध्याकाळपासून मनावर आलेले अशुभ मळभ, दाटून आलेली निराशा आणि काहीसं भीतीदायक वातावरण या सगळ्याचा मागमूस आताच्या या सकाळी नव्हता.वाटलं अरे! काळ उगीचाच आपण घाबरलो होतो, घाबरण्यासारखं काहीच तर नव्हतं.आहे ना, हा सुंदर प्रकाश देणारा सूर्य, ही प्रसन्न आशादायक सकाळ, हा उल्हसित करणारा वारा आहे! हे सर्व माझ्यासाठी, माझ्या जगासाठी किती स्फूर्तीदायक आहे!
वाटलं, अंधारानंतर प्रकाश येतोच! सकाळ उगवतेच!
आपल्याला वाटलं प्रलयकाळ आला आहे, सगळं संपलं आहे, पण नाही सृष्टीचं कालचक्र फिरतच राहते आहे . अनादी काळापासून अनादी काळापर्यंत! असे कित्येक क्षण, कित्येक युगे पाहिली असतील या सृष्टीने, पण कालचक्र फिरतच आहे अव्याहतपणे जशा समुद्राच्या लाटा, माघारी फिरल्या तरीही पुन्हा तितक्याच उत्कटपणे फेसाळत येणाऱ्या!
एक नवी उमेद, एक नवीन आशा दाखविणारा नवा दिवस, येणारच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, निराश, हताश व्हायचं काहीच कारण नाही. ठीक आहे, संकट आहे, मोठं संकट आहे पण प्रत्येक संकटावर उपाय असतोच ना! आपणही प्रयत्न करतोय, मनापासून केलेले प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होतातच असा विश्वास आहे माझा!
दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट घ्या. हिटलरच्या आक्रमणाखाली एकेक देश पराजित होत होता -पोलंडसारखा लहान देश, तो तर लगेच चिरडला गेला. पण एका छोट्या गावातील काही धाडसी तरुणांनी विरोध सुरु ठेवला. खरं तर हा विरोध म्हणजे महाभयंकर वादळवाऱ्यात लहानशी फडफडणारी पणती पेटविण्याचा प्रकार होता! पण पणती झाली काय किंवा मशाल झाली काय दोन्ही तेजाचीच रूपे! तेज आपला प्रभाव दाखविणारच ना?
पोलंडमधील या लहानशा गावातील तरुणांना लपण्यासाठी आश्रय देण्यासाठी कोरी टेन बूम नावाच्या दोन बहिणी पुढे आल्या. त्यांच्या मातीच्या घराच्या भिंती खूप रुंद होत्या, त्या भिंतीत कोनाडे आणि भुयारे तयार करून
क्रांतिकारी तरुणांना लपण्यासाठी सोय केली.
सांगायचा म्य्द्द हाच की संकट लहान असो, मोठे असो हातपाय गळून बसायचं नसतं. मानवी जीवनावरचा हा लढा सुरूच ठेवायला हवा. आधी एकटा असणारयाच्या पाठोपाठ "कारवाँ बनता चला आता है" आपण एकेक करून जर हे एकवीस दिवस यशस्वी केले तर विजय आपलाच आहे!
एक मात्र नक्की झाले.
हा आपला काळ सुरु होण्यापूर्वी बघा ना आपण सर्व जण किती मुक्तपणे हिंडत होतो, बोलत होतो, समारंभ, कार्यक्रम सर्व सुरु होते, आपण गर्दीत होतो परंतु तरीही आपण एकेकटेच होतो कारण सतत आपल्या हातात मोबाईल, व्हॉटस्अॅप, किंवा यु ट्यूब किंवा फोन! आपल्याबरोबर कोणी आहे, आपण कोणाच्या घरी आहोत, अगदी सिनेमा नाटकातदेखील सारखे तेच आणि तेच.! या सर्व गर्दीत असूनही, सोशल मिडीयावर असूनही आपण एकटेच होतो.
पण आता घरी बसल्यावर लक्षात येतेय की आपण किती अनमोल क्षणांना मुकलो होतो ते? कॉलेजात जाणाऱ्या आपल्या मुलीने नवीन ड्रेस दाखविला
होता का? विचारले तर म्हणाली तुम्हाला फोटो पाठविला होता ना; मुलगा जिमला जाऊन व्यायाम करतोय, म्हणाला तुम्हाला विचारूनच तर जिम लावली होती ! बायकोपण नोकरी करणारी पण ती घरचं सर्व आवरून अगदी ओटा वगैरे पुसून मुलांचा डबा वगैरे भरून आपल्या आधीही घरातून बाहेर पडत होती. आता लक्षात येतेय की ती किती काम करायची ते! आता घरी राहण्यामुळे कितीतरी दिवसांनी आम्हीचौघे आणि आई एकत्र जेवतोय, दुपारी झोपा काढतोय, पूर्वी कधीतरी आवडीने घेतलेली पुस्तके बाहेर आली, जुन्या कॅसेटस् ऐकल्या,
म्हणजे जेंव्हा गर्दीत होतो तेंव्हा एकटे होतो आणि आता एकेकट्याने राहूनही एकत्र येऊन लढा द्यायचा आहे!
No comments:
Post a Comment